Posts

Showing posts from May, 2021

कोर्ट ---वास्तू आणि वस्तू ..............................

  कोर्टाची वास्तू आणि कोर्टातल्या वस्तू हा लेखाचा विषय. आता एखाद्याला कोर्टाची वास्तू आणि तेथल्या वस्तू यात काय विषेश असणार आहे असे वाटण्याची शक्यता आहे. इतर वास्तूंसारखी वास्तू. पण प्रत्येकाचे या वास्तूकडे पाहणे निरनिराळे असते. म्हणून अनेकांना आपापल्या नजरेने तीच वास्तू वेगवेगळी वाटते. सामान्यतः लोकांना कोर्टाची पायरीसुद्धा चढायला नको वाटते. परंतु सध्याच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना ही पायरी चढावीच लागते. आमचे भाऊ नवीनच साक्ष देणाऱ्याला " या आधी मांडवाखालुन गेला नाहीत वाटते असे ,"म्हणायचे. न्यायदान करणा-यांस हे न्यायाचे मंदिर वाटते. कलाकार जसा रंगमंचावर पाऊल ठेवण्याआधी रंगमंचाला नमस्कार करतात, तसे न्यायाधीश सुद्धा न्यायासनाला नमस्कार करतात. न्यायालयीन कर्मचा-यांना कोर्ट हे आॕफीस असते. वेगवेगळ्या प्रकारचे काम सतत करायचे असते. वेळेची मुर्यादा तर असतेच असते. कोर्ट ही वकीलांची कर्मभूमी असते. बार रुममध्ये त्यांच्या बसण्याच्या ठराविक जागा असतात. परंतु कायम काहीच नसते . ते कोठेही बसून काम करु शकतात. पक्षकारांस दर तारखेस पुढे काय होतयं ही रुखरूख वाढवणारे असते कोर्ट . आपल्...

रस्त्यावरील अपघात...............................

  अपघात हा थोडासा भितीदायक शब्द असला तरी आपल्या प्रत्येकाच्या जवळचा शब्द आहे. प्रत्येकाला अपघाताने का होईना अपघाताला तोंड द्यावे लागलेले असते. कधी आपण पिडीत म्हणजे अपघाताचे बळी असतो, क्वचित आपणाकडुन अपघात झालेला असतो कमीतकमी साक्षीदार किंवा बघे तरी झालेले असतो. अपघात होऊन गेलेला असतो. एखादी गाडी किंवा ट्रक पडलेला असतो. जवळून जाणाऱ्या बसमधील लोकांच्या प्रतीक्रिया ऐकण्यासारख्या असतात. सर्वप्रथम हळहळ" अरेरे किती वाईट झाले". स्त्रीयांच्या तोंडून "चःचः "असे ऊदगार आपसुक येतात. पुरुष लोक ऊगीचच ऊठून, शक्य झाले तर ऊतरुन अपघात बघून येतात. अपघात कसा झाला असेल, चूक कोणाची असेल यावर चर्चा करतात. एकदोन मिनीटात निकालही देऊन टाकतात. एकांनी म्हटले की "जो निकाल लोक मिनीटात देतात ते ठरवायला कोर्टाला कितीतरी वर्षे लागतात". अपघात झाल्यावर आपण त्यात असू तर चूक समोरच्याचीच कशी झाली हे सांगू लागतो. तेथेही आपला स्वभाव जोराने भांडण्याचा वगैरे असेल तर बघायलाच नको. फार नुकसान वगैरे नसेल पोलिस येण्याची शक्यता नसेल तर मांडवली केली जाते. कधीकधी पोलिसही "बघून घ्या काहीतरी "असे ...

माॕल संस्कृती ................................

  खरेतर माॕल ही वस्तू खरेदी करण्याची साधीशी गोष्ट आहे . तीचा संस्कृती वगैरेशी संबंध असण्याचे काहीच कारण नाही. परंतु माॕलमधील खरेदी तेथेच न थांबता तीचा थेट जगण्याशी संबंध येत आहे असे वाटते . संस्कृती म्हणजे तरी काय, जगण्याची पद्धत. एखाद्या प्रदेशातील ब-याच लोकांना तसे रहायला , वागायला , बोलायला आवडू लागले की त्या लोकांची ती संस्कृती तयार होते असे वाटते . वर्षानुवर्षे करत करत पिढ्यानपिढ्या तसे वागू लागल्या की मग तिच्यावर पुटे चढून घट्ट आवरण तयार होते. तिच्यात बदलाला कोणी तयार होत नाही. या ना त्या कारणाने तीच्यात बदल होऊ लागले की सांध्यांची खडखड सुरु होते. प्रत्यक्षात त्यात गंभीर काहीच नसते. सुदैवाने मला परदेशातील प्रचंड मोठे माॕल व तेथील संस्कृतीचे थोडे दर्शन झाले. तेथे माॕलना माॕल न म्हणता "सुपर मार्केट" असे म्हणतात . मोठमोठया कंपन्या ती मार्केटस् चालवतात. तीच्या व्यवस्थापनामध्ये अर्थातच सगळीकडे असतात तसे वर्ग असतात. जनरल मॕनेजर, सेल्स मॕनेजर, मार्केटिंग मॕनेजर, स्टाफ वगैरे. त्यांना भरपूर काम असते. ब-यापैकी सुखसोयी असतात. आपल्याला व्यवस्थापनापेक्षा गि-हाईकांमध्ये जास्त रस आहे....

सर.............................

  "यथा शिखा मयुराणाम, नागानां मणयो तथा! तद् वद वेदांग शास्राणाम, गणीतं मुर्धनी स्थितम! म्हणजे ज्याप्रमाणे मोराचा पिसारा, नागाचा मणी डोक्यावर असतो, त्या प्रमाणे वेदांग शास्त्रा़ंत गणीत शिरोभागी शोभते. यासारखी गणीताची थोरवी सांगणारी अनेक वचने त्यांच्या क्लासच्या भिंतीवर लिहीलेली होती. ते होते अत्यंत विद्यार्थीप्रिय , तळमळीने विद्यार्थ्यांच्यापिढ्यान पिढ्यांना गणित शिकवणारे "श्रीधर जोगळेकर " म्हणजेच जोगळेकर सर. आमचे घर सरांच्या क्लाससमोरच असल्याने आमची सकाळ हं, बोला, "अ अधीक ब कंसाचा वर्ग बरोबर अ वर्ग अधीक दोन अब अधीक ब वर्ग " असे नियम ऐकतच होत असे. सकाळी सहाला पहिली बॕच सुरु होई. ती बहुधा अकरावीची असे. सर्व शाळांतील मुलांना ती सोयीची असे. प्रत्येक बॕचला कमीतकमी चाळीस पन्नास मुले मुली असत. जुन्या क्लासमध्ये पुर्वेकडे तोंड करुन स्टँडवर फळा ठेवलेला असे. मुली डावीकडे, मुले ऊजवीकडे, सरांसमोर सतरंज्यांवर बसलेली असत. सर भराभर खडूने लिहीत आहेत, तोंडाने ते वाचताहेत, मुलांकडून म्हणून घेत आहेत असे दृश्य असे.मुद्दा जोरात समजावून सांगताना हाताचा तळवा फळ्यावर आपटायचे. हं पुढ...

गुंतवणूक .................................................

  एकवेळ पैसा मिळवणे सोपे आहे परंतु तो योग्य मार्गाने खर्च करुन, साठवून वाढवणे महाकर्मकठीण आहे मला मला वाटते. लहानपणापासून आपण इतकी वर्षे इतके विषय शिकतो . त्यांचा प्रत्यक्ष आयुष्यात किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय ठरावा. अगदी व्यावसायीक अभ्यासक्रम घेतले तरी काॕलेजात शिकलेली थिअरी आणी प्रत्यक्ष काम त्यातील अडचणी , ज्ञान वेगळेच पडते. त्यामुळेच कधीकधी एखाद्या उत्तम व्यावसायीकापेक्षा चांगली पद्धत रोज ते काम करणारा काढू शकतो. आर्थिक विषयांचे मात्र तसे नसावे. एरव्ही सल्ला देणारे किती श्रीमंत झाले असते. ते तसे होतातही पण वेगळ्या मार्गाने. शिवाय माझा सल्ला चुकला , नुकसान झाले तर कोणीच कोणाला बांधील नसते. तर शाळेपासुन प्रत्येकाला साक्षर करण्याबरोबरच अर्थसाक्षर करण्याची जरुरी आहे असे वाटते. महाराष्ट्रात तर ही आवश्यकता जास्तच आहे असे मला वाटते. म्हणतात ना की पैसे खर्च झालेले चालते पण हिशोब लागला पाहिजे . चार पैसे कमी मिळाले तरी चालेल मुद्दलात घाटा होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. सोलापूरकडे एक म्हण आहे, "व्याजाला सोकला आणी मुदलाला मुकला" . अशी परिस्थिती होऊ शकते. "तुमची परिस्थ...

नटी...........................................

  शाम देवळे आणी कुमार नाईक अगदी जिगरी दोस्त. सतत लोकांच्या खोड्या काढणे, मजा करण्याचा स्वभाव. काॕमर्स काॕलेजचे विद्यार्थी . चुकूनही काॕलेजात जायचे नाहीत. म्हणजे दोन वह्या घेऊन घरातून बाहेर पडायचे. पास काढलेले असायचे. काॕलेजपर्येंत जायचे. कधी कँटीन कधी बाहेरच्या कट्यावर बसून गप्पा ठोकायचे. हे दरवर्षी पास कसे होतात याचे सगळ्यांना आश्चर्य वाटत असे. घरच्यांना बोलण्याचे कारण नव्हते . श्याम आणि कुमारला सिनेमा, नाटके पाहण्याचा चांगलाच शौक होता . सिनेमाला त्या काळी जास्तीत जास्त पाच रुपये तिकीट पडत असे. तर नाटकाला दहा पंधरा रुपये . सिनेमाच्या तिकीटाचे कसेबसे पैसे गोळा करता येत परंतु नाटकासाठी काहीतरी जुगाड करावा लागे. मग डोअरकिपरची ओळख काढ, मॕनेजरला भेटुन गप्पा मार ,चौकश्या कर असे उद्योग करत असत. काही करुन सगळे नाटक, कमीतकमी अर्धे नाटक तरी पाहिल्याशिवाय सोडत नसत. एकदा एका मोठ्या नाट्यसंस्थेचा "लग्नाची बेडी" नाटकाचा प्रयोग लागला . सगळीकडे जोरात जाहिरात चालू झाली . थेटरबाहेर पोस्टर लागले . "रश्मीच "काम "सुरेखा" ही अभीनेत्री करणार ...

जामीन................................

  रविवारचा दिवस. नऊ, साडेनऊ वाजलेले. अजून आॕफीस भरलेले नव्हते. म्हणजे पक्षकार येऊन भराभर कामे सुरु झाली नव्हती. आमच्या आॕफीसला मुख्यत्वे दिवाणी कामेच जास्त असायची. आमचे सिनीअर दादासाहेब खंबाटे विख्यात वकील. एखादे काम आले की अगदी सुप्रीम कोर्टापर्येंत जावे लागले तरी पिच्छा सोडत नसत. बोलायला मिठ्ठास, स्मरणशक्ती जबर. लक्ष्मी प्रसन्न होती. ते खूपच समाधानी असत. मी आणि माझा मित्र काका साखरे दोघेच ज्युनीअर होतो. काही वाचन करत बसलो होतो . नेहमीप्रमाणे दादा आले. दोन चार पक्षकारांनी नमस्कार केला . कामाच्या चौकशा , तारखा सांगणे वगैरे चालू झाले. पाचच मिनीटात एक पांढरी अँबेसेडर आॕफीससमोर आली. तीच्यातून दोन, तीन पांढऱ्या कपड्यातील व्यक्ती भरभर चालत आॕफीसात आल्या. नमस्कार , चमत्कार झाले. एका व्यक्तीने सांगितले की त्यांच्या एका नातेवाईकाविरुद्ध ऊत्तर प्रदेशातील एका न्यायालयाचे पकड वाॕरंट आले नाहे. पोलीस ते बजावणार आहेत. बर त्या नातेवाईकांचे म्हणजे "धरमशेठ "चे दुकान पोलीस स्टेशन समोर. येताजाता पोलीस त्यांना बघत, भेटत, रामराम करत. त्यामुळे पंचाईत. नेहमीच्या पद्धतीने पोलीसांनी मेहरबान होऊन का...

प्रभुकुंजास भेट.....................................

  महावीर जयंती का कसली सुट्टी होती. जेऊन मस्त आराम करत होतो. आमचे न्यायाधीश मित्र आले. "चला दिदींना भेटायला येता काय?" म्हणाले. दिदींना भेटायला कोणी बोलावल तर नाही म्हणणारा एकतर पृथ्वीवरचा नसेल किंवा कर्मदरीद्री असेल. म्हटले "काय विचारता राव?" हे कसे जमवलेत. तर त्यांनी सांगितले की काही कामांच्या चौकशीसाठी त्यांनी प्रभुकुंजाची भेट जमवली होती. प्रत्येक घरातले दोन दोन म्हटले तरी आठ दहा जण झाले. एक दोन कार होत्या. देवळात आपण जातो तरी तो काही प्रत्यक्ष दिसत नाही. येथे मात्र गानसरस्वतीचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते. सगळेजण आनंदाने नाचायचे बाकी होते. मुलांना ती मजा येव्हढी कळली नव्हती. त्यांना खाली गाडीत खालीच बसवायचे ठरले. फार नटल्यासारखे वाटू नये तरीही ऊत्तमात ऊत्तम कपडे वगैरे सगळ्यांनी घातले होते. दिदींना काय द्यायचे. शेवटी एखादा मोठासा बुके द्यावा असे ठरले. एरव्ही त्यांना देण्यासारखे आपल्याकडे किंवा कोणाकडे काय आहे? चारची अॕपाॕईँटमेंट ठरली होती. तीनला निघालो. हाजी अलीवरुन पेडर रोड. प्रभुकुंजाखाली एक बुकेवाला आहे. तेथून एक बुके घेतला. सिक्युरीटीला सांगितले . निरोप गे...

एस. ए. टू आय. एन................................

  "साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ." असे तुकोबा म्हणाले. तो योग आपल्याला येणे अवघड. कारण एकतर साधुसंतच कमी झालेत . आहेत ते थोर समाजसेवी आपल्याकडे कशाला फिरकतात. माझ्यासाठी आमच्या क्षेत्रातले ऊच्चपदस्थ , विद्वान असुनही सरळ, साधे असणारे अनेक न्यायमूर्ती हेच साधुसंत. प्रस्तावना फार झाली. भेटीगाठी या सदरात आता एकच भर घालून हा अध्याय संपवू. चिपळूणचे तालुका न्यायालय. आमच्याकडे जिल्हा न्यायाधीश, काही निमीत्ताने, न्यायमूर्ती येत असतात. एकदा बारचे अध्यक्ष वकिल मंडळी भेटायला आली. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर म्हणाले, "पुढच्या आठवड्यात कदाचित आपल्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती येणार आहेत. ते आपल्या न्यायालयाला भेट देऊ इच्छीतात . ते येऊदेत का? " मी उडालोच. एकदम परदेशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती . आमच्या इटकुश्या न्यायालयात. मी कोण आणी कसा नाही म्हणणार. कोणीही कोणत्याही न्यायालयात येऊ शकतो. बसू शकतो. ऐकू शकतो. पण हे कसे काय शक्य होणार. तर म्हणाले, " न्यायमूर्तींचे मुळ गाव चिपळूणजवळ आहे. पिढ्यानपिढ्या ते दक्षिण आफ्रिकेतच राहतात. आता त...

एक घर घेताना.................................

  काही मित्र मजेत सांगायचे "आम्ही पुण्यात घर घेतल. चाळीस, पंचेचाळीस लाख पडले. " कोणी म्हणायचे "आम्ही मुंबईत घर घेतल. फार आश्चर्य वाटायच. हे लोक पुणे, मुंबईत घरे कशी घेतात, कशाला घेतात. आपल्यालाही तसे करावे लागेल, करता येईल असे कधीच वाटत नव्हते . मुलाच्या लग्नाबाबत कुणकुण लागली. आता त्याला पुण्यात घर म्हणजे फ्लॕट लागेल. तेंव्हा काही करावेच लागेल. मग सुरु झाल्या चौकशा. प्रथम घर घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागते असे समजले. मग ते फाॕर्म आणणे. ते भरणे. फ्लॕट पाहणे. सुरवात तर केली. साईटस असतात असे कोणी म्हणाले. ते काही जमले नाही. मग ओळखीत सांगणे. मुलाबरोबर जाऊन दोन तीन फ्लॕट पाहून आलो. त्यांच्या किंमती व अंतरे पाहून ते काही जमेना. शेवटी होणारी सुनबाईच मदतीला धावली. पुण्यात शनीवार पेठेत अगदी मध्यवस्तीत एक फ्लॕट होता. मालक गोडबोले सरकारी नोकरीतुन निवृत्त झाले होते. ते दुसरीकडे रहायला गेले होते. म्हणून त्यांना फ्लॕट विकायचा होता. चांगली सोसायटी , चांगली जागा त्यामुळे लगेच पसंत पडली. मग किंमत. त्यातही फारशी घासाघीस न होता मनात खूप किंमत असताही आजोबा पन्नास लाखाला तयार झाले. मी किती ...